उद्या 6 ऑगस्ट
आद्याला जाऊन 3 महिने होतील आणि आज आहे Friendship Day .विचार करा आजचा दिवस साजरा करायला तुमचा मित्र तुमच्यासोबत नसणं याहून वाईट आणखी काय असू शकतं.मुळात माझा ह्या कुठल्याही डेज वर अजिबात विश्वास नाही
का ? कारण आम्ही पण बांधले होते फ्रेंडशिप बँड एकमेकांना, जेवलो होतो फ्रेंडशिप डे दिवशी एका हॉटेलात..आयष्यभरात कुठलंही संकट जरी आलं तरी एकमेकांना साथ देऊ असा चंग बांधला होता आम्ही; एवढंच काय आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे ह्याचेसुद्धा प्लॅन बनवून ठेवले होते आम्ही; पण झालं का काही ? सांगा मला झालं का काही , झाला काही उपयोग, तो फ्रेंडशिपबँडचा धागा राहिला का कायम आमच्यासोबत ? नाही ना
नाहीच राहिला... त्याला आयुष्याच्या त्या कठीण वेळी मला साधा फोन करावासा नाही वाटला. झाला काही उपयोग ?
तो धागा त्याला रोखू शकला नाही इथंच सगळं संपल, कदाचित माझी मैत्री कमी पडली असावी.
फार लवकर सरले ना तीन महिने. असंच वर्ष जाईल, वर्ष का वर्षें उलटतील पण मनाच्या कोपऱ्यात भळभळत असलेल्या त्या जखमेवरची खपली मात्र दर फ्रेंडशिप डे मात्र पुन्हा उडेल
.नियती इतकी निष्ठुर का बरं झाली असावी ? का तिने असा हा विचित्र खेळ खेळला असेल ? मला रोज रात्री हा प्रश्न पडतो पण ह्या माझ्या इवल्या जगात प्रश्नच इतके झाले आहेत की उत्तरं शोधून लिहिली तर एक वही भरेल आख्खी,पण अशा अनेक ज्ञात/ अज्ञात घटना नियतीने पचवलेल्या असतात आणि एक ढेकरही दिलेला नसतो साधा आणि आपण जेव्हा केव्हा हा सवाल विचारतो नियतीला तेव्हा तिच्याकडे उत्तरच नसतं असतात ते फक्त आपले अस्वस्थ श्वास आणि आपल्या डोळा आलेलं पाणी ह्या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळंच मिथ्या...
एक गाणं आहे जुनं हिंदी ते मला आठवतंय
आनेवाला पल जानेवाला है
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है...
त्याच्यामुळं आहे ह्या क्षणाला मोठं समजून तुमच्या मित्रांना केवळ तुमच्या मित्रांनाच नाही तर तुमच्या सर्व आप्तजनांना वागवा... कारण माणसं जेव्हा नसतात तेव्हाच त्यांची खरी किंमत कळते. काय माहीत येणारा काळ काय घेऊन येईल म्हणूनचं शक्यतो मित्रांना पुरेपूर वेळ द्या...
मला माझी आई , माझे अनेक मित्र,नातेवाईक म्हणाले गौरीश काळ हेच ह्यावरचं उत्तर सणार आहे पण मला नाही वाटत तसं कारण त्या अस्वस्थ श्वासांनी वरखाली होत असलेली छाती आणि भिजलेली उशी मला मात्र कधीच पारखी झालेली नाहीये !!!
©गौरीश देशपांडे
सदर लेख/पोस्ट ही मी माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला की जो आता ह्या जगात नाही आहे अशा आदित्यला अर्पण करत आहे...
आद्याला जाऊन 3 महिने होतील आणि आज आहे Friendship Day .विचार करा आजचा दिवस साजरा करायला तुमचा मित्र तुमच्यासोबत नसणं याहून वाईट आणखी काय असू शकतं.मुळात माझा ह्या कुठल्याही डेज वर अजिबात विश्वास नाही
का ? कारण आम्ही पण बांधले होते फ्रेंडशिप बँड एकमेकांना, जेवलो होतो फ्रेंडशिप डे दिवशी एका हॉटेलात..आयष्यभरात कुठलंही संकट जरी आलं तरी एकमेकांना साथ देऊ असा चंग बांधला होता आम्ही; एवढंच काय आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे ह्याचेसुद्धा प्लॅन बनवून ठेवले होते आम्ही; पण झालं का काही ? सांगा मला झालं का काही , झाला काही उपयोग, तो फ्रेंडशिपबँडचा धागा राहिला का कायम आमच्यासोबत ? नाही ना
नाहीच राहिला... त्याला आयुष्याच्या त्या कठीण वेळी मला साधा फोन करावासा नाही वाटला. झाला काही उपयोग ?
तो धागा त्याला रोखू शकला नाही इथंच सगळं संपल, कदाचित माझी मैत्री कमी पडली असावी.
फार लवकर सरले ना तीन महिने. असंच वर्ष जाईल, वर्ष का वर्षें उलटतील पण मनाच्या कोपऱ्यात भळभळत असलेल्या त्या जखमेवरची खपली मात्र दर फ्रेंडशिप डे मात्र पुन्हा उडेल
.नियती इतकी निष्ठुर का बरं झाली असावी ? का तिने असा हा विचित्र खेळ खेळला असेल ? मला रोज रात्री हा प्रश्न पडतो पण ह्या माझ्या इवल्या जगात प्रश्नच इतके झाले आहेत की उत्तरं शोधून लिहिली तर एक वही भरेल आख्खी,पण अशा अनेक ज्ञात/ अज्ञात घटना नियतीने पचवलेल्या असतात आणि एक ढेकरही दिलेला नसतो साधा आणि आपण जेव्हा केव्हा हा सवाल विचारतो नियतीला तेव्हा तिच्याकडे उत्तरच नसतं असतात ते फक्त आपले अस्वस्थ श्वास आणि आपल्या डोळा आलेलं पाणी ह्या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळंच मिथ्या...
एक गाणं आहे जुनं हिंदी ते मला आठवतंय
आनेवाला पल जानेवाला है
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है...
त्याच्यामुळं आहे ह्या क्षणाला मोठं समजून तुमच्या मित्रांना केवळ तुमच्या मित्रांनाच नाही तर तुमच्या सर्व आप्तजनांना वागवा... कारण माणसं जेव्हा नसतात तेव्हाच त्यांची खरी किंमत कळते. काय माहीत येणारा काळ काय घेऊन येईल म्हणूनचं शक्यतो मित्रांना पुरेपूर वेळ द्या...
मला माझी आई , माझे अनेक मित्र,नातेवाईक म्हणाले गौरीश काळ हेच ह्यावरचं उत्तर सणार आहे पण मला नाही वाटत तसं कारण त्या अस्वस्थ श्वासांनी वरखाली होत असलेली छाती आणि भिजलेली उशी मला मात्र कधीच पारखी झालेली नाहीये !!!
©गौरीश देशपांडे
सदर लेख/पोस्ट ही मी माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला की जो आता ह्या जगात नाही आहे अशा आदित्यला अर्पण करत आहे...
😢😢
ReplyDeleteUnknown
DeleteWho are you ?