Saturday, 21 October 2017

#आठवणीतले मोबाईल्स
काहीही म्हणा आज काल मोबाईलशिवाय कुणाचे पान हलत नाही. उठता बसता , चालता , फिरता , आपल्याबरोबर असतोच तो आपल्या जिवाभावाचा साथीदार आपला मोबाईल .
जनरली तरुण-तरुणींमध्ये त्याला कुणीही हात लावलेलं आपल्याला चालत नाही .उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळे अगदी त्या फोनला चिटकून असतो.
तसं म्हणलं तर मला नवनवीन गॅजेट्स आवडतात .
नुकतीच आयफोनला 10 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षात मोबाईलनी आपल्या जीवनात क्रांती केली.  मी अगदीच लहान  असताना 2003/04 माझ्या एका मामाचा  कैमरा  असलेला फोन होता .त्याकाळी साधे फोन बघायला मिळत नसत, कॅमेरा असलेला फोन म्हणजे एक अप्रुपच होतं.हळूहळू तंत्रज्ञान वाढत गेलं आणि आपल्या हातात नोकिया 1100, नोकिया 3310 असे फोन्स दिसायला लागले. मग जनरली सगळ्यांकडे नोकिया आणि त्यात आयडिया किंवा एअरटेलच कार्ड ते पण 500 रुपयांच .
नोकिया 1100 त्यात असलेली ती स्नेकची गेम आणि ती नोकियाची रिंगटोन, नोकिया 1600  त्यांची फेमस BL-5C बॅटरी यांचा तो काळ . मिनिटाला डिड दोन रुपये असणारा.त्याकाळी मोबाईल दुकानं पण कमी , मोबाईल दुरुस्त करणारा म्हणजे देवच , महिन्याला 100 एसएमएस फ्री , 50 ला 44 रुपयांचा रिचार्ज मिळायचा .
2007 ला आयफोन बाजारात आला आल्या आल्या त्यांन मैदान मारलं. नोकिया भारतीय बाजारात पाय रोवून घट्ट उभा होता. सॅमसंगचा नुसताच चनचूप्रवेश झाला होता.नोकिया एक से बढकर एक मॉडेल्स आणत होता .
नोकियाने आयफोनच्या धरतीवर C6,N900 , 5235 come with music असे बहारदार फोन्स आणले . 2010 चा तो काळ , त्या नोकिया मध्ये मोशन सेन्सरनी पहिल्यांदा गेम्स खेळले. मजा वाटायची मी साधारणतः 5 वीत असेंन त्यावेळी.  मायक्रोमॅक्स , कार्बन , लाव्हा हे फोन्स त्यावेळी आले . त्या मधील लावाची बॅटरी जबरदस्त होती. आयफोन 4 एस आला आल्या आल्या अमेरिकेत वादळ केलं, स्टीव्ह जॉब्सच्या काळातला तो शेवटचा आयफोन. हळूहळू सॅमसंग आणि मायक्रोमॅक्स यांनी अँड्रॉइड टच स्क्रीन फोन्स आणले . मला आठवतंय सॅमसंगनी गलेक्सी वाय , स्टार थ्री हे फोन्स आणले होते त्यातली ती "व्हाय धिस रिपीट " ही टोकिंग टॉम ची ऍड .
हे सगळं नवीन होत आणि भारतीय मनाला रुचल. मग सॅमसंगनी जोरदार मुसंडी मारली.सॅमसंगची गलेक्सी सिरीज फार चालली , गलेक्सी कोर,गलेक्सी ग्रँड क्वाट्रो , ग्रँड नियो असे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारे उत्तमोत्तम हँडसेट्स आले.ती गलेक्सी ग्रँडची मुलाला शाळेचा प्रोजेक्ट बनवायला मदत करणारी ऍड मी कधी विसरू शकणार नाही. ते फ्लिपकवर पहिल्यांदा फार भारी वाटायचं . पॅटर्नच लॉक आणि पिनकोड पण नवीन फोन घेतल्यावर पॅटर्नच लॉक टाकताना I am king of the world ची फिलिंग यायची. मोबाईलला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल तो सर्वोत्कृष्ट अशी माझी धारण होती, मायक्रोमॅक्सनी कॅनव्हास , कर्बननि A 29 , A 33 अशी मॉडेल्स आणून समाजमनाला भुरळ पाडली.
यात LG ,htc ,अश्या कम्पनि देखील होत्या.
2013 मध्ये 5C , 5S अशी दणकेबाज मॉडेल अँपल नि आणली . 5S नी तर विक्रीचा उच्चंक केला.  मोटोरोलाने मोटो जी , मोटो इ यासारखे फक्त ऑनलाइन मिळणारे फोन्स आणून जोरात  हवा केली. या सगळ्यात आपला जिवाभावाचा नोकिया कुठेतरी हरवून गेला होता.नोकियाने पण मग लुमिया 920, 820, 730 X ,XLase phons, आणले पण ते फार चालले नाहीत.  इथूनच नोकियाच्या अधोगती सुरुवात झाली . 2014 मध्ये ओप्पो आणि विवो,  भारतात आले आणि खऱ्या अर्थानी स्मार्ट फोनचं वलय सम्पलं . लेनोव्होनी A6000  
फोन आला आणि मग फोनच्या किंमती कमी होऊ लागल्या , कमी पैशात जस्तुत जास्त फैसीलिटी कोण देतंय यात जणू स्पर्धा लागली . मधनंतरी सॅमसंग हँग होतो,म्हणून त्याचा खप कमी झाला पण सॅमसंग जे सिरीज नी त्याला वर काढलं . आता  नोकिया पण सेट झालाय .
एकूणच काय या दहा वर्षात मोबाईलनी जीवनात आमूलाग्र बदल केले .ऑर्कुट, फेसबुक, मेल , पेमेंट्स सगळं काही मोबाईलवर आलं . ह्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही पण जीवन सुखकर झालं हे मात्र खरं .
© गौरीश देशपांडे

Monday, 9 October 2017

#एक रात्र सिंहगडावर
साधारणतः ऑगस्ट एंडला रोहित दादांनी एक पोस्ट केली की यावर्षीचा  एक रात्र साजरी करण्याचा प्रोग्राम हा सिंहगडावर होणार आहे .पोस्ट वाचून पहिल्यांदा खूप आनंद झाला कारण सिंहगड साताऱ्यापासून जवळ ,पटकन जात येईल आपल्याला अशी भावना मनात आली . पण रोहित दादांनी एक बॉम्ब टाकला की सिंहगडावर फक्त 60 लोकांचिंच रहायची व्यवस्था आहे . जे कोणी प्रथम येईल त्याला आम्ही प्राधान्य देऊ . मी एक क्षणाचा विलंब न लावता फोन केला पण रोहित दादांनी फोन उचललाच नाही मग एका मागोमाग एक असे 4/5 फोन केले मला वाटलं की आपल्याला उशीर झाला बुकिंग पूर्ण झाल  असेल म्हणून फोन उचलत नसतील.पण माझ्या सुदैवानी अस काही झाल नव्हतं रोहित दादा बाइक चालवत होते म्हणून फोन उचलत नव्हते .मग पटकन बुकिंग केल आणि निर्धास्त झालो आता फक्त तो दिवस यायची वाट बघत होतो . रोज एक एक दिवस सरत होता अन उत्सुकता वाढत होती .
अखेर तो दिवस उजाडला 7/10/17 माझ्या आयुष्यातील सर्वात मेमरेबल दिवस
सकाळी लवकर उठलो (टिप- येथे 8 म्हणजे लवकर आहे  कारण आदल्या दिवशीच परीक्षा सम्पली होती )
11 वाजता सातारा पुणे एसटी ने 1 वाजता पुण्याला पोहोचलो मग आमचे परममित्र श्री पुष्कराज घाटगे उर्फ बालकलाकार याला फोन लावला
विचारले कुठे आहात, व ते म्हणाले टिळक रोडला ये .
आवाजात नैसर्गिक तुसड़ेपणा होता ( पुणेरी ) . रिक्षतुन तलक रोडकड़े यायला निघलो तर परत पुष्कराजचा फोन  एस पी कोलेज जवळ उतर म्हणून मग  उतरलो
मग तो म्हणलाकी सरळ चालत ये ,
मी लागलो चालायला चांगला 700 मीटर तरी चाललो परत साहेबांचा फोन आहे तसा मागे ये
मी मगे येतोय येतोय है काही सापडेनातच , एव्हाना माझी अवस्था 'गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा' अशी झाली होती अखेर सापडले .फेसबुकवर भेटलेले मित्र काल प्रत्यक्षात भेटले ते म्हणजे शुभंकर अत्रे , सुधांशू कविमंडन , अक्षय जोग . मग अक्षय जोग सरानी आम्हाला फार फिरवलं आणि खाऊ पण घातलं , आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलो पण 5 ते 10 मिनिटात समरस झालो. अक्षरधाराला भेट देऊन उत्तमोत्तम पुस्तके घेतली आणि सिंहगडावर निघालो. सारसबागे पासून  रिक्षा केली आम्हला आमचे एक मित्र श्री सागर कुलकर्णी  जॉईन झालें मग सुरु आमचे मिशन सिंहगड .
आधीच 4 ला पोचायची डेडलाईन होती आणि आम्हला सारसबागेपाशीच पावणेचार वाजले होते. रिक्षात सुरू झाले शुभंकर विरुद्ध पुष्कराज पुणे वरसेस जळगाव वॉर.शुभंकर के ऐकतोय बोलायला शेवटी तो तर वकिलच, वरून मध्ये मध्ये तेल ओतायला मी
शेवटी पुणे कशी वाईट सिटी आहे हे पुष्कराजला आम्ही पटवून दिले पण तो लगेच एक्सेपशन तर असतच अस करून बोळवण करत होता.
त्या रिक्षेवल्याने आम्हला डोणजे येथे सोडले. तिथून अजून एक रिक्षा करून आम्ही गड  पायथ्याशी च  मध्येच एक पीएमपीएमेलची बस आडवी आली , रिक्षावाला फार तापला , बस ड्रायव्हर काय ऐकतोय ," आता मुंडेंचा शिष्य ना तो" शेवटी ते कसेतरी थांबले आणि त्यांनी आम्हाला पायथ्यापाशी सोडले.तिथे  कौस्तुभ पंत , शिवराम पंत आणि IP चे सदस्य भेटले  तिथून एका जीपमधून आम्ही 14 जण निघालो, आम्ही सहा जण जीपच्या मागील भागात बसलो आणि भरीला भर म्हणून शुभंकर मागे मी बारीक असल्याने माझं पार सँडविच झालं होतं . अखेर अर्धातासाने आम्ही सिंहगडावर पोहोचलो.तपोर्यंत साडेपाच झालेले.तिथून ते आपटे बंगल्यावर गेलो,बॅगा ठेवल्या , फ्रेश झालो , फोटो बरेच काढले, विचार केला स्टेटस अपडेट करून हवा करू, पण फोनला रेंजच नव्हती तोवर वाजले सव्वासहा रोहित दादांनी सगळ्यांना हॊल मध्ये बोलवले आणि  शिवरायांच्या आरतीने कार्यक्रम सूरु झाला पहिल्याच आरतीने वातावरण इतके भारावून टाकले होते की पुढचे काही तास परमोच्च आनंदाचे आहेत हे आपोआप समजले.मग रोहितदादा , जोशी सर यांनी ग्रुपची सुरुवात आतापर्यंतची वाटचाल सांगितली मग  यानंतर प्रत्येकाने स्वताची ओळख सांगितली , बुलढण्यापासून कोल्हापूरपर्यंत च्या गावातून लोक आलेले. या ओळखिच्या सेगमेंट संपायला 9 वाजले .प्रत्येकजण अगदी भरभरून बोलत होता. एव्हाना पोटात कावळे ओरडून झोपी गेले होते . मग जेवणं आले साधेसेच परंतु जेवण  अतिशय रुचकर होते,अहा उसळ तर काय होती, दिवस भराचा शीण क्षणात नाहीसा झाला. मग परत जेवणानंतर बैठक परत जमली. यानंतरचा इतिहासावरील प्रश्नमंजुषेचा सेगमेंट होता. पहिल्याच प्रश्नाचे उत्तर मी दिले, पण पूढे मी फिका पडत गेलो आणि प्रश्न गडद होत गेले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण श्री सचिन जोशी सर यांनी सिंहगडाची माहिती सांगितली तोवर चहा आला सगळे चहा पिऊन जर ताजे झाले . लोकमान्य आणि सिंहगड यांचे एक अनोखं नातं आहे. टिळक म्हणायचे की 'सिंहगडावरच्या वास्तव्यात मला स्वतंत्रता लाभते 'याच टिळकांचे आणि सिंहगडचे  नाते सांगणारी गदिमांनी लिहिलेली एक कविता मी सादर केली.त्यानंतर आपले पंडितजी म्हणजे श्री सुंधशुराव कविमंडन साहेब  यांनी टिळक आणि सिंहगडची अहिती सांगितली , सुधांशुरावना एवढे संस्कृत श्लोक कसे काय आठवतात हे  कोड मला अजून सूटलेलं नाही .नाहीतर माझं संस्कृत देवपाशी सुरु होऊन दहावीच्या बोर्डाच्या पेपरपाशीच सम्पले . यानंतर सुमारे रात्री दिड वाजता आम्ही सिंहगड भटकायला सुरुवात केली जोशी सर आम्हाला त्या कड्यापाशी घेऊन गेले जिथून तानाहजी वर आले हिते.रात्री दिड वाजता तो रोमांचकारी इतिहास ऐकून अंगावर काटा आला. 400 वर्षांपूवरी ज्यावेळी ज्याकड्यावरून तानाजी चढले त्याचवेळी आम्ही त्याच ठिकाणी  त्यांचा पराक्रम ऐकत  होतो . कोंबून जीपमधून आल्याची वेदना कुठच्या कुठे पळाली.
सगळे परतलो त्यावेळी अडीच वाजला होता. चतुर लोकांनी पटकन जागा पकडल्या, आम्हा 5 जणांना जागाच नव्हती ,मी खुर्च्या आणल्या आणि रात्री अडीच वाजता आपटे बंगल्याच्या प्रशस्त आवारात पुस्तके वाचत बसलो . मंद पहाटेच्या थंड हवा , आम्ही ती रात्र खरोखर जागलो, माझा उत्साह कमी नव्हता पण डोळे पॅव्हॅलीयन कडे मला ओढून नेत होते अखेर मी आत गेलो , तिथे बारीक असल्याचा फायदा झाला , एक निमुळत्या जागेत मी घुसलो मग थोडे इकडे थोडे तिकडे आक्रमण करून बरोबर  जागेत झोपलो .लवकर उठलो 6 वाजता गनिमी काव्याने फोन चार्ज केला.
 भरपेट नाश्ता 8 वाजता झाला मग सिंहगडावरच्या भटकंतीला सुरुवात झाली. सचिन सर आम्हाला पुणे दरवाजपासून ते राजाराम महाराज समाधीपर्यत सर्व ठिकाणे अगदी पूर्णपणे समजावुन सांगितली .माझ्या तीन फालतू प्रश्नांची उत्तरे हसतमुख राहून दिली.  मी त्या दोन दिवसात प्रचंड शिकलो ,इतक्या मोठ्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधता आला , त्यांच्या सहवासात दोन दिवस राहत आले याहून मोठा आनंद तो कैसा .
येताना शंतनू परांजपे उर्फ फिरस्तीकार नावाच्या अवलीयाची भेट झाली .भटकंतीवर बरीच चर्चा झाली . आपल्या ग्रुपचे लाडके व्यक्तिमत्व सौरभ रत्नपारखी यांना खूप  मिस केले.
हे सर्व पुण्यात आल्यामुळं शक्य झाले.
खरंच माणसानं निसर्गाच्या गडकिल्याच्या सहवासात गेलं पाहिजे .यात तुम्हाला स्वतःचा शोध घेता येईल आणि निसर्ग तुमच्याशी स्वतःहून बोलेल. माणसाने सरळ सह्याद्रीच्या मैदानात बागडत सुटावं, सह्याद्री अभेद्य आहे तो तुम्हाला नक्कीच सामावून घेईल .
समर्थानी तर म्हणलय "मना रे जनीं मौन्यमुद्रा धरावी, कथा आदरें राघवाची करावी , नसे राम ते धाम सोडोनि द्यावे , सुखालागी अरण्ये सेवीत जावे." या दोन दिवसात मी नव्याने जगायला शिकलो, अनेक दोस्तांना भेटलो ,ही आठवण माझ्या आयुष्यातील मोलाची साठवण आहे, ह्या आठवणींचा ठेवा मला चिरकाळ पुरेल.
©गौरीश देशपांडे 

Thursday, 5 October 2017

पांडेगीरी

असं काम करायला हवं की, आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल...पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे.
- #पांडेगीरी

Tuesday, 3 October 2017

बुलेट ट्रेन विकास आणि आपण

टाॅप टेन शंका.  उलट क्रमाने.
1.एवढी गरिबी असताना आणि पायाभूत सोयी सुविधा नसताना,  बुलेट ट्रेनची गरजच काय?
2. एवढ्या फास्ट मोटार गाडया असताना, विमानाची गरजच काय  ?
3. एवढ्या छान घोडा गाड्या असताना मोटार गाडीची गरजच काय?
4. एवढे दणकट पाय असताना, घोडागाडीची गरजच काय  ?
5. निसर्गामुळे एवढे वारे वहाताना एसी आणि पंखे यांची गरजच काय?
6 . एवढा मोठ्ठा सूर्य असताना विजेच्या दिव्याची गरजच काय  ?
7.एवढी मोठी झोपडी असताना, बंगला आणि  फ्लॅटची गरजच काय  ?
8. एवढी भक्कम गुहा असताना, झोपडी बिपडीची गरजच काय  ?
9. एवढे छान रूप असताना, नटण्या मुरडण्याची गरजच काय?
10. एवढे तमाशे आणि नाटकं असताना, सिनेमा आणि TV ची गरजच काय  ???????






आणि
उकिडवे बसता येत असून
कमोडची गरज काय ?☺️


Sunday, 1 October 2017

राजगडा रे राजगडा तुजवर जडली ही प्रीत असे

राजगड दर्शन हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.  राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा , नाजुक देशा कोमल  देशा फुलांच्याही देशा.  यातील प्रत्येक शब्द इथे अनुभवायला मिळतो.  अक्राळ विक्राळ सह्याद्री!  नजर  फिरवणारे त्याचे उत्तुंग कडे, दर क्षणाला नवीन भासणारी निसर्गाची रूपे किती किती अन काय काय सांगावे?  हे प्रत्यक्ष पहावे तेव्हा समजेल.

राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी.  शिवाजी महाराजांचे तब्बल २५ वर्षे इथे वास्तव्य झाले. इथून समोरच सिंहगड, पुरंदर, तोरणा हे गड दिसतात.  धुके नसेल तर, रायगडही दिसतो.  नुसत्या डोळ्याने. दुर्बिण वगैरे काही लागत नाही.

आता इथे माणसाचा वावर कमी.  पण निसर्गाची नवलाई भरपूर पहायला मिळते.  ऑर्किड च्या फुलांचे गुच्छ च्या गुच्छ.  सबंध गडावर तेरडा फुललेला असतो.  सगळा गड जांभळा दिसत असतो.  काही ठिकाणी पिवळी धम्मक सोनकी फुललेली असते.   पाऊस इतका प्रचंड, की झाडांच्या खोडावर शेवाळे आलेले असते. धुक्याचे लोट च्या लोट येत असतात.  सूर्य झाकोळून जातो. खारूची नावाचा एक देखणा शिकारी पक्षी तर इथे रहायलाच आहे.  उडता उडता हवेत थांबणे हे याचे वैशिष्ट्य.

राजगड दमवतो फार.  कुठल्याही बाजूने चढा.  दमणूक होतेच. पण नंतर मिळणारा आनंद इतका असतो की दमण्याचे काही वाटत नाही. इतिहास व निसर्गाशी नाते जुळते. आनंदाचे डोही आनंद तरंग उमटत रहातात. आणि आपोआप तोंडी शब्द येतात,  राजगडा रे राजगडा तुजवर जडली प्रीत असे!

हिरेन देशपांडे  , गौरीश देशपांडे 

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...