एक दिवस ,एक गाणं
जर लोकांना विचारलं की तुमचं वेळ घालवण्याचं साधन काय, किंवा तुमचा छंद काय तर बऱ्यापैकी लोक गाणी ऐकणे हेच सांगतात.भारतीय लोकांच्या आयुष्यात गाण्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. खरंच गाणी असतातच सुंदर,जीवनाचं मर्म सांगणारी, जगण्याला दिशा देणारी...80 चं दशक बॉलिवूडसाठी एक वाईट दशक मानलं जातं,पण या दशकातली गाणी मात्र बेस्ट..आजही कुठल्याही देशी सलूनमध्ये अल्ताफ राजाच जास्त ऐकला जातो..
किंवा मिरवणुकीत ' में हू डॉन 'हे गाणं वाजलं नाही अशी एकसुद्धा मिरवणूक नसेल..
तर अश्याच काही उत्तमोत्तम गाण्याचं कलेक्शन माझ्याकडे आहे.काही गाणी अशी आहेत त्यात किशोरकुमारनं तल्लीन होऊन खर्ज लावला आहे, मन्ना डेनं अप्रतिम असं क्लासिकल गायलं आहे.लताबाईंचे,किशोरीताई यांचे सूर म्हणजे तर स्वर्गच..
साथ साथ नावाचा एक पिक्चर आहे फारुख शेख आणि दीप्ती नवल यांचा.हा पिक्चर आहे 83 सालातला, ते दशक म्हणजे अस्वस्थतेचं प्रतीक मानलं जातं. समाजवादाबद्दलचं आकर्षण त्यानंतरची ती 'आणीबाणी' मग त्यानंतर जनता सरकारकडून झालेला लोकांचा अपेक्षाभंग.चांगला पर्याय कोण ह्या विचारत असलेली तरुणाई आणि त्यांच्या आयुष्यात होत असलेले बदल ह्यावर हा सिनेमा भाष्य करतो. हा सिनेमा सुंदर गाण्यांनी भरलेला आहे.
ह्या सिनेमात गीता (दीप्ती नवल) ही एका प्रतिथयश उद्योगपतीची मुलगी असते.ती अविनाश (फारुख शेख) च्या प्रेमात पडते.अविनाश हा एक Idealistic तरुण असतो.त्याच्या त्याच्या वेगळ्या कन्सेप्ट असतात.त्या फॉलो करून तो एक आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो.
मग गीता आणि त्याचं लग्न होतं.मग गाणं येतं
जर लोकांना विचारलं की तुमचं वेळ घालवण्याचं साधन काय, किंवा तुमचा छंद काय तर बऱ्यापैकी लोक गाणी ऐकणे हेच सांगतात.भारतीय लोकांच्या आयुष्यात गाण्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. खरंच गाणी असतातच सुंदर,जीवनाचं मर्म सांगणारी, जगण्याला दिशा देणारी...80 चं दशक बॉलिवूडसाठी एक वाईट दशक मानलं जातं,पण या दशकातली गाणी मात्र बेस्ट..आजही कुठल्याही देशी सलूनमध्ये अल्ताफ राजाच जास्त ऐकला जातो..
किंवा मिरवणुकीत ' में हू डॉन 'हे गाणं वाजलं नाही अशी एकसुद्धा मिरवणूक नसेल..
तर अश्याच काही उत्तमोत्तम गाण्याचं कलेक्शन माझ्याकडे आहे.काही गाणी अशी आहेत त्यात किशोरकुमारनं तल्लीन होऊन खर्ज लावला आहे, मन्ना डेनं अप्रतिम असं क्लासिकल गायलं आहे.लताबाईंचे,किशोरीताई यांचे सूर म्हणजे तर स्वर्गच..
साथ साथ नावाचा एक पिक्चर आहे फारुख शेख आणि दीप्ती नवल यांचा.हा पिक्चर आहे 83 सालातला, ते दशक म्हणजे अस्वस्थतेचं प्रतीक मानलं जातं. समाजवादाबद्दलचं आकर्षण त्यानंतरची ती 'आणीबाणी' मग त्यानंतर जनता सरकारकडून झालेला लोकांचा अपेक्षाभंग.चांगला पर्याय कोण ह्या विचारत असलेली तरुणाई आणि त्यांच्या आयुष्यात होत असलेले बदल ह्यावर हा सिनेमा भाष्य करतो. हा सिनेमा सुंदर गाण्यांनी भरलेला आहे.
ह्या सिनेमात गीता (दीप्ती नवल) ही एका प्रतिथयश उद्योगपतीची मुलगी असते.ती अविनाश (फारुख शेख) च्या प्रेमात पडते.अविनाश हा एक Idealistic तरुण असतो.त्याच्या त्याच्या वेगळ्या कन्सेप्ट असतात.त्या फॉलो करून तो एक आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो.
मग गीता आणि त्याचं लग्न होतं.मग गाणं येतं
ये तेरा घर ये मेरा घर किसी को देखना हो गर
तो पहले आ के माँग ले, मेरी नज़र तेरी नज़र
ये तेरा घर ये मेरा घर
ये घर बहुत हसीन है ...
न बादलों की छाँव में, न चाँदनी की गाँव में
न फूल जैसे रास्ते बने हैं इसके वास्ते
मगर ये घर अजीब है, ज़मीन के क़रीब है
ये ईंट पत्थरों का घर, हमारी हसरतों का घर
ये तेरा घर ये मेरा घर ...
जो चाँदनी नहीं तो क्या, ये रोशनी है प्यार की
दिलों के फूल खिल गये, तो फ़िक़्र क्या बहार की
हमारे घर न आयेगी, कभी खुशी उधार की
हमारी राहतों का घर, हमारी चाहतों का घर
ये तेरा घर ये मेरा घर …
तो पहले आ के माँग ले, मेरी नज़र तेरी नज़र
ये तेरा घर ये मेरा घर
ये घर बहुत हसीन है ...
न बादलों की छाँव में, न चाँदनी की गाँव में
न फूल जैसे रास्ते बने हैं इसके वास्ते
मगर ये घर अजीब है, ज़मीन के क़रीब है
ये ईंट पत्थरों का घर, हमारी हसरतों का घर
ये तेरा घर ये मेरा घर ...
जो चाँदनी नहीं तो क्या, ये रोशनी है प्यार की
दिलों के फूल खिल गये, तो फ़िक़्र क्या बहार की
हमारे घर न आयेगी, कभी खुशी उधार की
हमारी राहतों का घर, हमारी चाहतों का घर
ये तेरा घर ये मेरा घर …
नव्यानेच झालेलं लग्न,त्यांच्या आयुष्याची स्वप्नं,ती पूर्ण करण्यास येत असलेली असमर्थता तरी सुद्धा आहे त्यात गोड मानून छोटे छोटे क्षण जगण्याचा केलेला पुरेपूर प्रयत्न या गाण्यात उठून दिसतो.त्यात पुन्हा दीप्ती आणि फारुख ही जोडी म्हणजे अफाट..
एक प्रेमात पडलेली अल्लड तरुणी ते अविनाशला तू चुकतोयस हे ठामपणे सांगणारी बायको हा प्रवास तिने उत्तम साकारला आहे.आणि ते ओझं तिनं सहज पेललं आहे,फारुख बद्दल बोलेल तेवढं कमी पडेल..एक आदर्श विचारांना फॉलो करणारा तरुण ते आपल्या कौटुंबिक गरजा भागवताना त्याच आदर्शांची पायमल्ली होताना पाहून,परिस्थितीपुढे हात टेकलेला, आतल्या आत तुटणारा पण तोंडावर हास्य दाखवणारा अरुण चांगला वाटतो.
हे गाणं म्हणजे नव्यानेच लग्न झालेल्या,नव्या नव्या प्रेमात पडलेल्या लोकांसाठी एक अजरामर असं गाणं आहे.नवी स्वप्नं , नव्या दिशा, नवी जिद्द, नव्या आकांक्षा, नवी क्षितिजे यांचा पट रंगवणाऱ्या लोकांनी हे गाणं नक्की पाहायला हवं..
मग वाट कसली पाहताय, अडकवा इयरफोन्स आणि आनंद लुटा ह्या गाण्याचा.. ☺️
©गौरीश देशपांडे

No comments:
Post a Comment